मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराज्य प्रवास करणाऱ्या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला आज (10 फेब्रुवारी) हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. आणि त्यासाठीच शुक्रवारी म्हणजेच, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील.
दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरातील काही मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. तसेच, या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात असून, मोठं-मोठे बॅनर रस्त्यांवर लावण्यात आले आहे. तर काही ठिकाणी पांढऱ्या कपड्याने रस्त्यांच्या कडेला असणारी घरे आणि झोपड्या यांना झाकण्यात आलं असल्याचं दिसून आलं आहे.
बाअदब, बामुलाहिज़ा, होशियार!
शहंशाह मोदी मुंबई जा रहे हैं। उनकी नजरों को गरीबी न दिखे इसका इंतजाम कर दिया गया है।
हर बार की तरह गरीबों के घरों को ढक दिया गया, ताकि शहंशाह का गरीबी देख मन खराब न हो।
शहंशाह इस मर्तबा दरियादिल हैं, उन्होंने गुजरात की तरह दीवार नहीं खड़ी करवाई। pic.twitter.com/VRE5O3UBOY
— Congress (@INCIndia) February 9, 2023
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट शेअर करण्यात आलं असून, यामध्ये मुंबईतील रस्त्यांच्या कडेला असणारी घरे आणि झोपड्या यांना पांढऱ्या कपड्यानं झाकण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“बाअदब, बामुलाहिज़ा, होशियार! बादशाह मोदी मुंबईत येत आहेत, त्यांच्या डोळ्यांना गरीबी दिसू नये म्हणून सोय करण्यात आलीय. दरवेळी प्रमाणे गरीबीला झाकून ठेवण्यात आलं आहे. जेणेकरून बादशाहाचे मन गरीबी पाहून दुःखी होऊ नये.यावळी बादशाहाने मोठं मन दाखवत गुजरातप्रमाणे भींत बांधून घेतली नाहीये” असं खोचक ट्विट काँग्रेसकडून शेअर करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून मोदी मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर विमानतळावरून ते थेट सीएसएमटीच्या दिशेनं रवाना होतील.कुलाबा, रिगल जंक्शन आणि पी डमेलो रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंतच्या वाहतुकीवर दुपारी 2 ते 4 या वेळेत काही प्रमाणात परिणाम होईल. त्याचबरोबर, देशांतर्गत विमानतळ ते मरोळपर्यंत उन्नत मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीत दुपारी 4 ते संध्याकाळी 6 या वेळेत किंचित बदल केला जाणार आहे.