नवी दिल्ली :- राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालानुसार देशात दररोज 246 मुली आणि 1027 महिला बेपत्ता होत आहेत. कडक कायदे असूनही दररोज 87 महिलांवर बलात्कार होत आहेत. वर्ष 2021 मध्ये राजस्थानमध्ये 6337 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले.
मध्य प्रदेशात ही संख्या 2,947 उत्तर प्रदेशात 2,845 आणि महाराष्ट्रात 2,496 आहे. मध्य प्रदेशात एका वर्षात 13,034 मुली आणि 55,704 महिला बेपत्ता झाल्या. महाराष्ट्रात 3937 मुली आणि 56498 महिला बेपत्ता झाल्या आहेत. जर आपण संपूर्ण देशाबद्दल बोललो, तर 2021 मध्ये 90113 मुली बेपत्ता झाल्या, तर बेपत्ता महिलांची संख्या 375058 होती.
मणिपूरमधील घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना महिलांवरील गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. महिला अत्याचाराची घटना राजस्थान, छत्तीसगड किंवा मणिपूरमधील असो, कठोर कारवाई झालीच पाहिजे असे त्यांनी सांगितले.
एनसीआरबीच्या अहवालात असे म्हटले आहे की 2021 मध्ये राजस्थानमध्ये 6337 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. बलात्काराचा हा आकडा कोणत्याही राज्यात सर्वाधिक ठरला आहे. मध्य प्रदेशात 2947, यूपीमध्ये 2845, महाराष्ट्रात 2496 आणि छत्तीसगडमध्ये 1093 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. देशात पाच वर्षांत म्हणजे 1825 दिवसांत दीड लाख महिलांवर बलात्कार झाले आहेत. म्हणजे रोज 87 महिला या अपराधाला बळी पडत आहेत.
एनसीआरबीचा वर्ष 2021 चा अहवाल सांगतो की, छत्तीसगड बलात्काराच्या घटना असलेल्या टॉप 10 राज्यांमध्ये समाविष्ट नाही. 2020 च्या अहवालातही छत्तीसगडचा समावेश पहिल्या 10 राज्यांमध्ये नाही.
बलात्कारात राजस्थान अव्वल
वर्ष 2021 आणि 2022 मध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये राजस्थान अव्वल ठरले आहे. 2019 मध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक 5997 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. 2018 मध्ये मध्य प्रदेश बलात्काराच्या 5433 प्रकरणांसह पहिल्या क्रमांकावर होता. राजस्थानचा क्रमांक दुसरा होता. 2017 मध्येही मध्य प्रदेश बलात्काराच्या घटनांमध्ये अव्वल राहिला. दुसरा क्रमांक उत्तर प्रदेशचा होता. राजस्थान तिसऱ्या स्थानावर होता.
2021 मध्ये देशात एकूण 31677 बलात्काराच्या घटना घडल्या. 2020 मध्ये बलात्काराच्या 28046 घटना घडल्या. बळींची संख्या पाहिली तर हा आकडा 28153 इतका आहे. 2019 मध्ये बलात्काराच्या 32033 घटना घडल्या. त्यापैकी पीडित महिलांची संख्या 32260 आहे.
2018 मध्ये एकूण 33356 बलात्काराच्या घटना घडल्या. बळींची संख्या 33977 झाली आहे. 2017 मध्ये 32559 बलात्काराच्या घटना घडल्या. या प्रकरणांमध्ये बळींची संख्या 33658 झाली आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाच वर्षात 159048 हून अधिक बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.