डोर्लेवाडी -शर्यतबंदीच्या काळात अनेक ठिकाणी चोरून बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या गेल्या. पोलिसांनी अनेक बैलगाडा मालकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
आता सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यत परवानगी दिल्याने आता यापूर्वी झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आता बैलगाडा मालक यांच्याकडून करण्यात येत आहे.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील शेतकरी आणि बैलगाडा प्रेमीनी पेढे वाटून, फटाके वाजवत आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला आहे. तसेच सोनगाव येथील शेतकऱ्यांनी देखील बैलगाडा चालक मालक यांनी आपल्या सर्जा राजाची वाजत गाजत
जल्लोषात गावांमध्ये मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत बंदी घालण्यात आली होती. ती उठविण्यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून यासाठी सातत्याने वारंवार प्रयत्न केले गेले.