सणसवाडी – शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावला आहे. हा भ्रष्टाचार रोखला पाहिजे. तसेच शिक्षण म्हणजे वाघीणीचे दूध आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते,पण अलीकडे या वाघीणीच्या दुधात पाणी मिसळल्यासारखे वाटतेय, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
मंत्री बच्चू कडू यांनी आदर्श शाळा वाबळेवाडी येथे भेट दिली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार काकासो पलांडे, आमदार अशोक पवार, समता परिषदेचे प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भुजबळ उपस्थित होते . वाबळेवाडीची ही “आंतरराष्ट्रीय ख्यातीची’ शाळा पाहाण्यासाठी इंदापूर, कुडाळ, मुळशी, कल्याण आदी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून शेकडो गाड्यांतून आलेल्या शिक्षणप्रेमींना पाहून राज्यमंत्री बच्चू कडू यांना आश्चर्याच धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी जिल्हा प रिषदेची शाळा पहाण्यासाठी एवढी सारी लोकं दूर दूरवरून येतात, म्हणजे नक्कीच आनंदाची बाब आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. काही ग्रामीण भागातील शिक्षक गावकीचे राजकारणात गुरफटून शाळेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गावाजवळ बदल्यांचे धोरण बदलावे लागेल, असे त्यांनी सांगितले.