नवी दिल्ली – भारतात करोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांत 22 हजारांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी, 8 हजार लोक करोनापासून बरे झाले आहेत. देशात करोनामुळे 406 लोकांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील करोना सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 781 वर पोहोचली आहे आणि रुग्ण बरे होण्याचा दर 98.32% आहे. त्याचबरोबर या करोनामुसळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 81 हजार 486 झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 8हजार 949 बरे झाले झाल्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 75 हजार 312 लोक करोना संसर्गमुक्त झाले आहेत.