मुंबई- महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढतो आहे. मात्र राज्याला आता दुसऱ्या संकटाला सामोरं जावे लागणार आहे तो संकट म्हणजे उन्हाळा. राज्यात उन्हाचा प्रकोप वाढतो आहे.
राज्यातील उन्हाळ्यातील हे वाढतं तापमान पाहता हवामान खात्याने महाराष्ट्रातील नागपूर शहरात पुढील काही दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भात दरवर्षीच उन्हाचा पारा 45 डिग्रीच्या वर असतो. मात्र या वर्षी लाॅकडाऊनमुळे प्रत्येकाला त्याची झळ पडत नाही आहे. मात्र 31 मे ला लाॅकडाऊन संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर जनतेला त्याचा त्रास होऊ नये. याची खबरदारी घेण्यासाठी रेड अलर्ट जारी केला गेला आहे.
नागपूरमध्ये पारा 46.7 डिग्री सेल्सियसवर पोहचला आहे. सलग दुसऱ्या दिवशी नागपूर महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. गरमीमुळे, उष्णतेमुळे नागपूरचे रस्ते निर्मनुष्य झाले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नागपूर देशातील सर्वात उष्ण शहरांतील यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.