Election Commission | Summer Temperature – देशाच्या काही भागांमध्ये येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, याचा मतदानाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम हेाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने सोमवारी हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध संबंधीतांची बैठक घेतली.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे या बैठकीला उपस्थित होते. देशात सात टप्प्यातील मतदानाचे आणखी सहा टप्पे अजून व्हायचे आहेत. भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. । Election Commission | Summer Temperature
हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, उष्णतेच्या लाटेच्या संबंधात आमचा विभाग भारतीय निवडणूक आयोगाच्या सतत संपर्कात आहे. हंगामी अंदाजांसोबतच, आम्ही मासिक, आठवडावार आणि दैनंदिन अंदाज मांडत आहोत.
एप्रिल ते जून या कालावधीत देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, मध्य भारत आणि पश्चिम द्वीपकल्पीय भारतावरील उष्णतेच्या लाटेचा धोका अधिक आहे. तेथे हा प्रभाव कमी करण्यासाठी काय उपाय योजना केल्या जातील याचीही माहिती निवडणूक आयोग करीत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपले आणि २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ६० टक्के मतदान झाले.अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले आहेे, त्याचे कारण कडक उन्हाळा हेही देण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग या बाबत सतर्क झाला आहे. । Election Commission | Summer Temperature