मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू लावण्यात आला आहे तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, तरीही राज्यातील कोरोना रुग्णसंख्या काही केल्या कमी घेताना दिसत नाही. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद ते मुंबई धावणारी तेजस एक्सप्रेस एक महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहे.
आईआरसीटीसीतर्फे चालवण्यात येणारी 82902/82901 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल- अहमदाबाद तेजस एक्सप्रेस आजपासून (2 एप्रिल) एक महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहे.
राज्यात काल तब्बल 43 हजार 183 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल 32 हजार 641 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 24,33,368 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.2% एवढा झाला आहे. राज्यात आज 249 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
सध्या राज्यातील मृत्यूदर 1.92% एवढा आहे. महाराष्ट्राच्याजवळ असणाऱ्या गुजरात राज्यात काल सर्वाधिक 2410 कोरोनाबाधितांची नोंद झाली. गुजरात राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 10 हजार 108 वर गेला आहे. अहमदाबादमध्ये काल 626 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.