Cooking Oil Prices : केंद्र सरकारकडून लवकरच सर्वसामान्यांसाठी एक चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने देशात खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी सरकारकडून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. खाद्यतेलाच्या किमती बर्याच काळापासून स्थिर आहेत आणि दर महिन्याला त्यांच्या किमतीत किरकोळ बदल पूर्वीच्या दरानुसार होत आहेत.
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या तेल कंपन्यांना देशातील खाद्यतेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय किमतीनुसार कमी करण्यास सांगितले आहे. मात्र, खाद्यतेलाच्या किमती अचानक कमी करणे सध्यातरी शक्य होणार नाही, असे स्वयंपाकाच्या तेल उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मार्चपर्यंत देशात मोहरी काढणीला सुरुवात होईल तेव्हा खाद्यतेलाच्या किमती कमी होतील. मोहरी काढणीनंतर खाद्यतेलाचा नवीन पुरवठा होईल, त्यानंतर खाद्यतेल किंवा स्वयंपाकाच्या तेलाचे दर कमी होऊ शकतात,असे सांगण्यात येत आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तेल कंपन्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय दरानुसार किंमती कमी करण्यास सांगितले आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाचे दर जागतिक किमतीच्या सापेक्ष कमी केले पाहिजेत, जे काही काळापासून होत नव्हते, त्यामुळे आता त्या दिशेने पावले उचलली पाहिजेत.
खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता टाळण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. डिसेंबरमध्येच सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात करण्याच्या निर्णयाची मुदत आणखी वाढवली आहे. आता खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क मार्च 2025 पर्यंत लागू राहील.