नवी दिल्ली – फोन टॅपिंग प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सीमा बलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये अतिरिक्त महासंचालकपदावर होत्या.
रश्मी शुक्ला या मार्च 2016 ते जुलै 2018 या कालावधीत पुणे पोलीस आयुक्त होत्या.
हैद्राबाद येथील येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे आता बदली होऊन सीमा बलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात 2019मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काळात कॉंग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना खासदार संजय राऊत, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप करण्यात आले होते. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवला होता.