मुंबई – मुंबईत 2022 मध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. ते म्हणाले की, नोव्हेंबर 2022 पर्यंत एका वर्षाच्या कालावधीत मुंबईत सायबर फसवणुकीची किमान 4,286 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, असे त्यांनी राज्य विधान परिषदेत आमदार भाई गिरकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या गुन्ह्यांमध्ये झालेली ही वाढ 70 टक्के इतकी आहे. नोव्हेंबर 2022 पर्यंत शहरात क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन फसवणुकीच्या 1,294 प्रकरणांची नोंद झाली असून त्यापैकी 37 प्रकरणे सोडवण्यात आली आहेत.
या कालावधीत ऑनलाइन खरेदी, क्रिप्टो चलन गुंतवणूक, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश, विमा, गुंतवणूक आणि नोकऱ्यांमध्ये फसवणूक अशा प्रकारची 2,216 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पर्यंत एका वर्षात नोंदवलेल्या 4,268 सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांपैकी केवळ 279 गुन्ह्यांची उकल होऊ शकली आहे असे त्यांनी म्हटले आहे. सायबर गुन्हे शोधण्यासाठी मुंबईत पाच पोलिस ठाणी आहेत.