जयपुर – राजस्थानातील पंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचा वरचष्मा दिसून आला आहे. सहा जिल्ह्यातील एकूण 1564 जागांपैकी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी 598 जागा जिंकल्या असून भाजपला 490 जागा मिळाल्या आहेत.
शनिवारी सकाळी सहा जिल्ह्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारी चार वाजेपर्यंत एकूण 1389 जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यात कॉंग्रेसला सर्वाधिक म्हणजे 598 जागा मिळाल्या आहेत.
आरएलपी पक्षाला 39, बहुजन समाज पक्षाला 10 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना 250 जागा मिळाल्या आहेत. 26 व 29 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका झाल्या होत्या. पंचायत समित्यांच्या 1564 जागां खेरीज सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या दोनशे जागांसाठीही मतदान झाले आहे. यातील बहुतेक निकाल अजून हाती यायचे आहेत.