जयपूर – राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत कॉंग्रेस पक्षालाच बहुमत मिळेल असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आरोप केला की भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रचारात प्रक्षोभक भाषा वापरली आणि धर्माचे कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांनी त्यांना नाकारले आहे. राजस्थानमधील 200 विधानसभा मतदारसंघांपैकी 199 जागांसाठी शनिवारी मतदान झाले असून मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना गेहलोत म्हणाले की, प्रचारात भाजपने कोणत्या स्तराची चिथावणीखोर भाषा वापरली हे सर्वांनी पाहिले आहे, परंतु ते धर्माचे पत्ते खेळण्याचा त्यांचा डाव लोकांनी हाणून पाडला आहे. लोकांनी त्यांना नाकारले आहे आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार आहे,असे ते म्हणाले.
पंतप्रधान, गृहमंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी राजस्थानमध्ये प्रचार काळात येऊन जी भाषा वापरली त्यातून प्रक्षोभ निर्माण होऊ शकला असता परंतु राजस्थानच्या जनतेने त्यांना प्रतिसाद दिला नाही असे गहलोत यांनी नमूद केले. मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेसच्या बाजूने अंडरकरंट आहे आणि त्याचे प्रत्यंतर येत्या ३ तारखेला येईल.