मुंबई:विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच आघाडीबाबत राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर यांच्यात आघाडी होणार कि नाही ? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आघाडीसाठी सकारात्मक असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
विधानसभेसाठी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करायची होती. पण वंचित बहुजन आघाडीकडून काही संकेत न आल्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकाँग्रेस हेच एकत्रिरित्या निवडणूक लढवणार असल्याचे, चव्हाण म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी विरोधात बातम्या पेरून संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे. पण आपण सगळे एकत्र असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सुद्धा स्पष्ट केले आहे.