मुंबई – राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असताना विरोधी पक्षाकडून भाजपवर घोडेबाजाराचे आरोप करण्यात येत आहेत. यावर आता भारतीय जनता पार्टीवर आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सिद्ध करावेत अन्यथा काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शिवसेनेचे आमदार १५ वर्षे सत्ता नसतानाही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर ठाम राहिले, ते आत्ता कसे फुटतील? शिवसेनेने आपले आमदार फुटतील या भीतीने नव्हे तर दुसऱ्याच कुठल्यातरी कारणास्तव त्यांना हॉटेलवर नेऊन ठेवले आहे. भाजपा कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही. भाजापा विचाराच्या लढाईवर काम करीत आली असून यापुढेही राहिल. आमदार खरेदी-विक्रीचा तुमचा आरोप असेल तर आपल्या फोनमधील या संभाषणाचे रेकॉर्ड काढावे आणि सादर करावे. अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेची आणि आपल्या आमदारांवर अविश्वास दाखवल्याबद्दल त्यांचीही माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Sudhir Mungantiwar ,BJP: Congress and NCP have made allegations of horse trading against us, they should prove this charge within 48 hours or apologize to the people of Maharashtra. https://t.co/AAgt26I2se pic.twitter.com/mbDYpzZa6l
— ANI (@ANI) November 8, 2019
दरम्यान, समसमान सत्तापदांचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला अडीच वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्रिपद हवे आहे. मात्र, त्या पदावरील दावा सोडण्यास भाजप तयार नाही. त्यातून सरकार स्थापनेविषयी निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे दृष्टीपथात नाहीत. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि विरोधी पक्षांनीही अजून पत्ते खोललेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत नेमके काय घडणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.