Gautam Gambhir – श्रीलंकेविरुद्धच्या गुवाहाटीत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील ७३वे शतक झळकावले. त्याचबरोबर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४५ शतकांचा आकडा गाठला आहे. विराट कोहलीने वर्षाच्या शेवटी बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातही शतक ठोकले होते. त्यानंतर आता वर्षाच्या सुरुवातीला याच फॉरमॅटमध्ये त्याने सलग दुसरे शतक केले. आगामी काळात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाकडे पाहता विराट कोहलीचा फॉर्म भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
दसून शनाका ९८ धावांवरच बाद झाला असता पण रोहितने दाखवलं मोठं मन; तुम्हीही त्याचे कौतुकच कराल!
कालच्या (मंगळवार) सामन्यात विराट कोहलीने ८७ चेंडूत ११३ धावांची खेळी खेळली. यावेळी त्याने भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरच्या बऱ्याच विक्रमांना मागे टाकले आहे. त्यामुळे आता अनेकांनी विराटची तुलना सचिनशी करण्यास सुरुवात केली आहे. विराट कोहली सचिनपेक्षा वेगाने धावा बनवत असल्याचे दिसत आहे. मात्र, या सगळ्यामध्ये भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीची सचिन तेंडुलकरशी तुलना करणे अजिबात योग्य नाही, असे म्हटले आहे.
टीम इंडिया सज्ज! टी-20 नंतर आता वनडे मालिका जिंकण्याचे लक्ष्य; उद्या दुसरा एकदिवसीय सामना!
गंभीरने म्हटले की,”खरे सांगायचे तर ही काही रेकॉर्डची बाब नाही. विराट कोहली एकदिवसीयमध्ये सचिनपेक्षा जास्त शतके झळकावले आणि त्यात काहीही शंका नाही, पण आताच्या क्रिकेटचे नियम बदलले आहेत. तुम्ही दोन वेगवेगळ्या काळातील खेळाडूंची एकमेकांशी तुलना करणे हे योग्य नाही. पूर्वी एका सामन्यासाठी फक्त १ नवीन चेंडू होता, परंतु आता २ नवीन चेंडूंचा वापर केला जातो. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाचा बाबतीत ५ क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या आतमध्ये राहू शकतात. पण विराट हा सध्या या फॉरमॅटचा मास्टर प्लेअर आहे.”
“It’s not about the record, honestly. Virat Kohli will go on to get many more centuries than Sachin Tendulkar in the 50-overs format. See, the rules have changed. You should not compare eras,” @GautamGambhir said.#INDvSL https://t.co/TWot1S0eMz
— Circle of Cricket (@circleofcricket) January 11, 2023
विराट कोहली एकदिवसीयमध्ये सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांपासून अवघी ४ शतके मागे आहे. त्यामुळे तो लवकरच सचिनच्या या विक्रमाला मोडीत काढेल. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटने सर्वात वेगाने १२ हजार ५०० धावांचा टप्पा गाठण्याचा विश्व विक्रम नावावर केला. विराटने हा विक्रमी टप्पा २५७ डावांमध्ये पार केला आहे. ही कामगिरी करण्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला ३१० डाव खेळावे लागले होते. सचिननंतर रिकी पाँटिंग ३२८ डाव, कुमार संगकारा ३४५ डाव, सनथ जयसूर्या ४०२ डाव आणि माहेला जयवर्धने ४११ डावांमध्ये ही कामगिरी केलेली आहे. विराटने ही कामगिरी सर्वात जलद करत विश्वविक्रम आपल्या नावावर केलाय.