Budget 2024 – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता संसदेत आर्थिक वर्ष 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीपूर्वी सादर होणारा मोदी सरकारच्या चालू कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सुमारे तासभर भाषण केले. अर्थसंकल्पाकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. अर्थसंकल्पाबाबत देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. रोटी, कपडा, मकान देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
गेल्या ६० वर्षांत जे निर्णय झाले नाहीत, ते गेल्या १० वर्षांत झाले. गरीब, शेतकरी, महिला व तरुण या चार प्रमुख घटकांना त्यांनी न्याय दिला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करावं, हे त्यांनी दाखवून दिलं. आजच्या अर्थसंकल्पात महिला व मुलींना प्राधान्य दिलं आहे. पंतप्रधान आवास योजनेत २ कोटी घरं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारे रोटी, कपडा, मकान देणारा हा अर्थसंकल्प व हे केंद्र सरकार आहे.
– एकनाथ शिंदे.मुख्यमंत्री
मोदी काय म्हणाले ?
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाचे भविष्य घडवणारा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारतासाठी हा एक समर्पित अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प युवा भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. ही एक मजबूत भविष्याची हमी आहे.
#LIVE | केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया… https://t.co/OuDCJWuwvS
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 1, 2024
अमित शहा म्हणतात..
गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या दृष्टीकोनाला साकार करण्यासाठी एक रोडमॅप सादर करणारा आहे. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात भारताला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर बनवण्याच्या प्रवासात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकते, असेही शहा म्हणाले.
शहा यांनी ‘X’ वर ‘Developed India Budget’ हॅशटॅगसह लिहिले की, “केंद्रीय अर्थसंकल्प 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी एक रोडमॅप सादर करतो. भारताला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर बनवण्याच्या प्रवासात मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षातील कामगिरीवर अर्थसंकल्पीय भाषणात प्रकाश टाकण्यात आला आहे.