CM KCR : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांनी आता मोर्चा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे वळवला असल्याचे दिसत आहे. कारण तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील मेडीगड्डा धरणाच्या बांधकामात राव व त्यांच्या कुटुंबियांनी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे. नक्षल्यांचे तेलुगू भाषेतील एक पत्र व्हायरल झाले असून त्यात त्यांनी हा आरोप करण्यात आला आहे.
२१ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास मेडीगड्डा धरणावरील पुलाच्या तीन खांबांना तडे गेल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे तेलंगणा सरकारने या मार्गावरील वाहतूक बंद करून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पुलाच्या खांबांना तडे गेल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
तेलंगणात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर या मुद्यावरून विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली असताना आता या वादात नक्षलवाद्यांनीही उडी घेतली आहे. एक पत्रक काढून त्यांनी मुख्यमंत्री केसीआर व त्यांच्या कुटुंबीयांवर धरण बांधकामात मोठा घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत.
या घटनेनंतर धरणातील पाणी अचानक सोडल्याने महाराष्ट्रातील सिरोंचा तालुक्याला याचा फटका बसला. त्यामुळे अनेकांची शेते पाण्याखाली गेली तसेच जनावरेही वाहून गेली. त्यामुळे धरणाच्या बांधकामावर प्रश्न निर्माण झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रकात नक्षल्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील या सिंचन प्रकल्पात मोठे कमिशन घेतल्याचेही म्हटले आहे. त्यामुळेच धरण बांधकामाच्या वेळेस पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माध्यमांना देखील पत्रकातून धमकावण्यात आले