नवी दिल्ली – नागरिकांची कर्ज काही काळासाठी पूर्णतः माफ करावी आणि ते सरकारने भरावे. तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लोकांच्या हातात पैसेही दिले पाहिजे, असे मत नोबेल विजेते डॉ.अभिजित बॅनर्जी यांनी मांडले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिजित बॅनर्जी यांच्यासोबत संवाद साधला.
अभिजित बॅनर्जी म्हणाले कि, एमएसएमई क्षेत्रात आपण हे सहजपणे करू शकतो. काही काळासाठी कर्जवसुली आपण थांबवू शकतो. आणि ते योग्यही ठरेल. याहीपेक्षा सरकारही तिमाहीचे कर्ज फेडू शकते. केवळ कर्जाची परतफेडीचा कालावधी पुढे-मागे करण्यापेक्षा ते माफ करणेच योग्य ठरेल, असे मला वाटते.
ते पुढे म्हणाले, दोन गोष्टी आहेत एक म्हणजे दिवाळखोरीची साखळी टाळायची कशी? यासाठी कर्जमाफी एक मार्ग असू शकतो. आणि दुसरी म्हणजे नागरिकांच्या हातात पैसे देऊन अर्थव्यवस्थेचे चाक फिरवू शकतो. अशाप्रकारे अमेरिका मोठ्या प्रमाणात करत आहे. आपणदेखील असे करू शकतो.
लॉकडाऊनमुळे सध्या अनेक छोटे-मोठे उद्योगांना समस्यांचा सामना करावा लागत आहेत. यामुळे बरेच व्यवसाय दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अनेक जण बेरोजगार होउ शकतात. या पार्श्वभूमीवर लोकांना प्रोत्साहन पॅकेजेस द्याव्यात असे आमच्यासारखे अर्थशास्त्रज्ञ म्हणत आहेत. केवळ अमेरिकाच नव्हे तर जपान-युरोपही पॅकेजेस दिले आहेत. परंतु, भारताने याबद्दल अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. आम्ही अद्याप जीडीपीच्या केवळ 1 टक्क्याबद्दल बोलत आहोत. अमेरिकेने जीडीपीच्या 10 टक्के इतके पॅकेज दिले आहे, असेही अभिजित बॅनर्जी यांनी म्हंटले आहे.
A conversation with Nobel Laureate, Abhijit Banerjee on the economic impact of the COVID19 crisis. https://t.co/dUrok8Wm3Q
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2020