Chitra Wagh : राज्यात मागील काही दिवसांपासून आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूर, ठाणे आणि नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील मृत्यूने आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा चेहरा उघडकीस आला आहे. दरम्यान, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्ण दगावल्याच्या राजकीय वातावरण देखील तापले आहे.
नांदेडच्या रुग्णालयात एकामागून एक नेत्यांचे दौरे सुरूच असून त्यात आता भाजपच्या महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांवर टीका केली. “नांदेड घटनेवरून विरोधक राजकीय सलाईनने राज्यात वणवा पेटवण्याचे काम करत असल्याचे”, चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
नांदेडच्या रुग्णालयात भेट दिल्यानंतर चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी माध्यमांशी संवाद साधताना,”सरकार बदलल्यावर एक वर्षातच हे रुग्ण मृत झाले, असा विरोधीपक्ष सूर लावत आहेत. त्यांना उत्तर देण्याची ही वेळ आणि जागाही नाही. तर, नांदेडच्या घटनेतून राजकीय सलाईन घेऊन विरोधकांकडून राज्यात वणवा पेटवण्याचे काम सुरू झाले असल्याचे चित्रा वाघ (Chitra Wagh)म्हणाल्यात.
पुढे बोलताना त्यांनी,”आरोग्य हा सरकारचा पहिला प्राधान्यक्रम आहे. घटना घडल्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये आले. एका दिवसात 14 निर्णय घेतले गेले. यामध्ये काय त्रुटी आहे, त्यासंबंधी योग्य निर्णय घेतले गेले. 2800 पदांची भरती मॅटच्या स्टेमुळे थांबली होती, तोही मार्ग मोकळा झाला आहे. आज मुख्यमंत्री आरोग्य विभागाशी संवाद साधणार आहेत. त्यासोबतच सीएस, आरोग्य अधिकारी, विभागीय अधिकारी यांची समिती तयार करून आपल्या परिसरातील रुग्णालयाला भेटी देऊन काय कमी आहे. याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्याचे चित्रा वाघ (Chitra Wagh)म्हणल्या आहेत.