मुंबई – अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) पुन्हा एकदा पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे ट्रोल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या विश्वचषक सामन्यादरम्यान प्रसारित झालेल्या पान मसाल्याच्या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार दिसला आहे. यामुळे नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा त्याच्यावर निशाणा साधला आहे. मात्र या जाहिरातीबाबत अक्षय कुमारने स्पष्टीकरण दिले आहे.
अक्षय कुमारने एक्सवर (ट्विटर) ‘विमल पान मसाल्याचा अॅम्बेसेडर म्हणून अक्षय कुमार परतला’, अशा मथळ्याने बातमी देणाऱ्या एका वेबसाईटला जोरदार सुनावलं. “अॅम्बेसेडर म्हणून परतला? जर तुम्हाला खोट्या बातम्यांव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जास्त रस असेल तर काही फॅक्टचेक मी तुम्हाला सांगतो. या जाहिराती 13 ऑक्टोबर 2021 रोजी शूट केल्या गेल्या होत्या. मी जाहीरपणे अशा उत्पादनांचं समर्थन करणार नाही, अशी घोषणा केल्यापासून माझा ब्रँडशी काहीही संबंध नाही. ”
‘Returns’ as ambassador? Here’s some fact check for you Bollywood Hungama, if by chance you are interested in things other than fake news. These ads were shot on 13th October, 2021. I have not had anything to do with the brand ever since I publicly announced the discontinuation…
— Akshay Kumar (@akshaykumar) October 9, 2023
“ते आधीच शूट केलेल्या जाहिराती कायदेशीररीत्या पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत चालवू शकतात. आता शांत व्हा आणि काही खऱ्या बातम्या द्या,” असं अक्षयने म्हटलं आहे. दरम्यान, या पूर्वी पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे ट्रोल झाल्याने त्याला खूप ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर अक्षय कुमारने अशा जाहिराती पुन्हा करणार नसल्याचे म्हंटले होते. मात्र आता ही जाहिरात पुन्हा एकदा समोर आल्याने त्याच्यावर टीका केली जात होती. अखेर त्याने या जाहिरातीमागचे सत्य उघड करत स्पष्टीकरण दिले आहे.