मुंबई -राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवारांचा झालेला पराभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्यांची यशस्वी भाजप नीती व आमदारांच्या संतप्त भावनांच्या कडेलोट मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या पुढ्यात आला आहे.
राज्यसभा निवडणुकीत काल दुसऱ्या पसंतीची मते मिळवून भाजपचे तीन नंबरचे कोल्हापूर येथील उमेदवार धनंजय महाडिक 41 मते मिळवून राज्यसभेवर निवडून आले.अतिरिक्त मतांवर विजयी झालेल्या महाडिकांना मतांची आकडेवारी अभ्यासून भाजपने निवडून आणले तथापि त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे केंद्रातील नेते मुख्तार अब्बास नकवी हे एक महिनाभर अगोदरपासून मविआ सरकार विरोधात पध्दतशीरपणे प्रचार करत होते.
भाजपचे प्रथम पसंतीचे राज्यसभा उमेदवार पियुष गोयल ह्यांच्या उमेदवारीचा अर्ज गाजावाजा न करता निवडणूक प्रक्रियेत दाखल झाला तरी मविआचे नेते गाफील होते. मविआची सुरूवातच मुळांत निवडणूक अर्जांची मुदत संपायच्या आधी कशीबशी चटावरची श्राध्द उरकली जातात तशा पध्दतीने अगदी अल्पावधी बैठकातच उरकली गेली होती.
तथापि पराभवानंतर आत्मचिंतन किंवा मनन न करताच पुन्हा राज्यसभेवर निवडून जाताना काठावर पांस झालेले शिवसेनेचे संजय राऊत ह्यांनी ब्लेमगेम सुरू करत राष्ट्रवादी, कॉंग्रेस, सपा, बविआ पासून एकमेव अपक्षांवरही संजय पवारांच्या पराभवाचे खापर फोडले.
त्याउपरची कारणे घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्या राऊत ह्यांनी जाणून घेणे महत्वाचे आहे असे अपक्षांशी बातचीत करताना समजते. देवेद्र भुयार, संजय शिंदे ह्यांनी तर थेट राऊतांवरच हल्ला चढवला. मिडीया सामेरे येताना प्रसिध्दी काहीही बोलत सुटत नाहीत अशी टीकाही करताना पराभवाचे कारण प्रमुख नेतेच असल्याचे सांगितले.
अपक्षांतील एका नाराज आमदाराने पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार संजय जैस्वाल ह्यांच्या आरोपाचा धागा पकडत मंत्री आमदारांच्या कामातून टक्केवारी मागत असतील तर त्याला अर्थ काय? असा सवाल केला. हे असेच पुढ़ेही सुरूच राहिले तर राज्यसभा निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव हा इशारा देणारा असली तरीही काही दिवसांनी होणारी विधानपरिषद व नंतरच्या सर्वच सार्वत्रिक निवडणुका ह्या शिवसेनेबरोबर न राहता लढवाव्या लागतील असेही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, राज्यसभा निवडणकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्यांचे कौतुक करताना राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार ह्यांनी मविआने योग्य सावधगिरी बाळगली नसल्याचे विधान केले तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ह्यांनी संजय राऊत थोडक्यात बचावल्याचे मत आपल्या प्रतिक्रियेत व्यक्त केले.
मुख्यमंत्री भेटत नाहीत
मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे हे कोणालाही भेटत नाही. अगदी आमदार, खासदारांनाही मातोश्रीवर पूर्वी परतविले जायचे अगदी जवळपास तशाच पध्दतीने परतवतांत.लोकप्रतिनिधींच्या पिडा ते समजून घेत नाही. मतदारसंघातील आमदारांची कामे होत नाहीत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंबाबतही आमदार समाधानी नाहीत. एकतर आदित्य ठाकरे आमदारांना मंत्रालयात भेटतच नाहीत. अन्यत्र्य कुठेही उपलब्ध होत नाहीत. अगदी महत्वाची बैठक असली तरी आमदारांना ते टाळतांत त्यामुळे आमच्या आमदारांच्या व्यथा त्यांच्यामार्फतही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचत नाहीत.