नागपूर – मराठा आरक्षणावर बोलताना अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जातीय जनगणना करण्यावर जोर दिला आहे. तशी मागणी भुजबळांनी सरकारकडे केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की, राज्यात 6 कोटी लोक मराठा आहेत. मग माझे म्हणणे आहे की, जातीय जनगणना करा. मग स्पष्ट होईल की कोणत्या समाजाचे किती लोक राज्यात आहेत, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री भेटलो. त्यात यावर काही बोललो नाही. कॅबिनेट समोर अहवाल आला तर त्यावर चर्चा करेल. मनोज जरांगे यांच्या सूचना, मागण्या एक एक वाढत चालल्या आहेत.
आधी मराठवाड्यासाठी कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली. आता महाराष्ट्रसाठी मागणी करत आहेत. एससी एसटी आरक्षण मध्ये कुठला फॉर्म्याला लावायचा हा प्रश्न येईल. त्याचा अभ्यास करावा लागेल.
10 खुर्च्या असताना 25 लोक आले तर कुणालाच जागा मिळणार नाही. ओबीसीमध्ये कुणबी म्हणून मराठा मागच्या दाराने आले तर मूळ ओबीसीला काहीच मिळणार नाही. राजकीय फायदा मिळणार नाही.
मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले तर शैक्षणिक, राजकीय आरक्षण त्यांना लागू होईल. ओबीसी मुद्द्यावर माझ्या पक्षातील नाही तर इतर पक्षातील लोकही बोलत नाही. ज्यांचे घर जाळले ते देखील बाजू मांडत नाहीत.