Chhagan Bhujbal : राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून शिंदे सरकारमधील नेत्यांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरु आहे. अशात अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशात ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा दावा केला होता. दरम्यान भुजबळांच्या भाजप प्रवेशावर आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आरपीआयचे नेते रामदास आठवले म्हणाले,’छगन भुजबळ ओबीसी प्रश्नासाठी अनेक वर्षांपासून लढा देत आहे. ओबीसींच्या प्रश्नांवरूनच त्यांनी शिवसेना सोडली होती. त्यांनी राजीनामा देऊ नये, त्यांनी मंत्रिमंडळात राहिलं पाहिजे. मात्र ते भाजपात आले तर त्यांचं स्वागतच आहे. भाजप पेक्षा ते आरपिआय मध्ये आले तर स्वागतचं.’ असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले,’मी लोकसभेचा माणूस. संधी मिळाली तर शिर्डी लोकसभा लढण्यास मी इच्छुक आहे. लोकसभेत संधी मिळाली तर पुन्हा मंत्रीपद नक्की मिळेल. 2009 साली शिर्डीत काही गैरसमजातून माझा पराभव झाला.मात्र आता मी केंद्रात मंत्री आहे. पुन्हा शिर्डी लोकसभा लढवावी यासाठी अनेक लोक आग्रही आहेत,” असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.