Shirur Loksabha Election| शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिरूरमधून त्यांचा सामना शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत होणार आहे. मात्र याच दरम्यान अमोल कोल्हे यांनी शिरुर लोकसभेत माझ्या विरोधात छगन भुजबळांना यांना निवडणुक रिंगणात उतरवणार होते, असा गौप्यस्फोट केला. याबाबत स्वत: छगन भुजबळ यांनी खुलासा केला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ ? Shirur Loksabha Election|
छगन भुजबळ म्हणाले की, “नाशिकमधून माझे नाव फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढता का? अशी विचारणा केली होती. शिरूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज आहे. भुजबळ हे नाव नाशिकमध्ये फायनल झालं होतं. पण मुख्यमंत्री शिंदे यांना अडचण होती, त्यामुळे त्यांनी मला शिरूरमधून लढण्याबाबत विचारले होते.”
“त्यांचा हेतू हा होता की मी तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल. एक चांगला हेतू होता. ते प्रयत्न करणार होते. पण मी सांगितलं की ओबीसी समाज महाराष्ट्रभर आहे. माझा संबंध नाशिकशी आहे, मी पालकमंत्री आमदार नाशिकचा आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला नकार दिला,” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून भुजबळांची माघार Shirur Loksabha Election|
छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘नाशिक लोकसभा मतदार संघातून मी माघार घेत असल्याचे’ त्यांनी जाहीर केले. उमेदवार जाहीर होण्यास खुपच उशीर होत आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन, महायुतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपण पूर्णपणे माघार घेत आहे,” असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते.
काय म्हणाले होते अमोल कोल्हे? Shirur Loksabha Election|
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरुर लोकसभेत माझ्या विरोधात छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते. पण भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिला. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे कोल्हे म्हणाले. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव अशी लढत झाली होती. यंदाही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही उमेदवार आमने सामने असणार आहेत.
हेही वाचा: