मुंबई – राज्यात सध्या सत्तेत असलेला शिंदे ग्रुप आणि शिवसेना यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेले असताना राज्यात जोरदार सत्तासंघर्ष पाहायला मिळतोय.अशात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका नव्या सुरुवातीची घोषणा केली आहे. संभाजीराजे यांनी याबाबत एक ट्विट करत माहिती दिली आहे.
“क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात” अशा आशयाचे ट्विट छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. त्यासोबतच भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला असे देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी स्वराज्य हा हॅशटॅग वापरता उत्कंठा आणखी वाढवली आहे.
क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात…
भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला…#स्वराज्य
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 3, 2022
काही दिवसांपूर्वी संभाजी राजेंना तुळजापूर येथे प्रवेश नाकारला होता त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता राजे ९ ऑगस्टला तुळजापूरमध्ये नेमकी काय घोषणा करणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्यात सुरु असलेले राजकारण आणि संभाजीराजे यांनी वापरलेला स्वराज्य हॅशटॅग यामुळे ९ ऑगस्टला नेमकं काय होणार हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.