पुणे – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात संभाजीराजे छत्रपती यांनी ‘स्वराज्य’ संघटनेतून राजकीय आखाड्यात आघाडीवर होती. या स्वराज्य संघटनेनं महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये जोरदार मुसंडी मारली असल्याचं दिसून आले . स्वराज्य संघटनेचे धाराशिव येथील सरपंचासह 13 सदस्य निवडून आले आहेत.
अशातच छत्रपती संभाजीराजे काही दिवसातच स्वतंत्र पक्ष स्थापन करता राजकारणात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात संघटन उभारण्याची सुरुवात संभाजीराजेंनी काही महिन्यांपूर्वी केली. या संघटनेचे अनेक उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विजयी झाले. विजयी उमेदवारांचा गौरव सोहळा लवकरच संभाजीराजेंच्या हस्ते पार पडणार आहे. याच सोहळ्यात संभाजीराजे मोठी घोषणा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर संभाजीराजेंच्या नव्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागल आहे.