Amol Kolhe : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी (दि. २७) जुन्नर शिवनेरी येथून आक्रोश मोर्चा मंचर (ता. आंबेगाव) येथे आला असता राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले कीकेंद्र सरकारच्या कांदा निर्यातीमुळे ६० लाख क्विंटल कांदा बाजारात आल्याने शेतकऱ्यांचे बाराशे कोटी रुपयांची नुकसान झाले असून, यास भाजप सरकार जबाबदार आहे.
केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठवावी, तसेच दुधाला योग्य दर द्यावेत, दिवसा वीज पुरवठा करावा अशा विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.’ असं ते म्हणाले.
दरम्यान, आज मोर्चा दुसरा दिवस असून शिरूर मध्ये असताना जातेगाव येथे एका वृद्ध आजीने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे तोंड भरून केलं. तसेच आपल्या हातानी कोल्हे यांचा जेवण देखील भरवले आहे.
यावेळी आजींनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत, कसा आहेस बाबा उन्हातान्हात फिरतोस. किती शेतकऱ्यांची काळजी घेतोस असं तोंड भरून कौतुक केलं.
ईश्वर तुझं भलं करो असा आशीर्वाद दिला.आणि कडकडून मीठी मारत आशिर्वादही दिला.यावेळी या आजीने मायने अमोल कोल्हे यांना भाजी भाकरी खाऊ घातली आणि भाजी भाकरीची शिदोरीचे गाठोडे सुद्धा सोबत दिले. आजींच्या या कौतुकानं अमोल कोल्हे भारावून गेल्याचं चित्र यावेळी दिसून आलं.