राजगुरूनगर (प्रतिनिधी) : राजगुरुनगर येथे चास कमान धरणाच्या डाव्या कालव्यात दुचाकीवरून पडून एका युवा उद्योजक बुडाल्याची घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. पंचशील विठ्ठल फलके वय ४५ रा. राजगुरूनगर ता खेड असे त्या युवा उद्योजकाचे नाव आहे.
याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचशील फलके हे पुणे नाशिक महामार्ग डाक बंगल्याजवळून चास कमान धरणाच्या डाव्या कालव्यावरून राजगुरुनगर शहराच्या बाजूकडून त्यांच्या दुचाकी क्र एमएच १४ ईडी ५९३९ वरून कालव्याच्या राजगुरूनगरच्या दिशेकडून जात असताना दुचाकीवरून कालव्यात पडून वाहून गेले.
त्यांना पोहता येत नव्हते. त्यांची दुचाकी कालव्याच्या कडेला पडली होती. मागून येणाऱ्या नागरिकांना दुचाकीवरील व्यक्ती दिसून न आल्याने त्यांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान ही घटना समाजात शहरातील युवकांनी घटनास्थळी जाऊन पाण्यात शोधाशोध केली. त्यांचा फोन लागत नव्हता. शहरातील २० ते २५ जणांनी कालव्यातील पाण्यात सुमारे दोन किमी शोध घेतला मात्र अद्यापपर्यत त्यांचा शोध लागला नाही.