मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सरळ सेवा भरती प्रक्रियेतील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारण्याचा मुद्दा चर्चेत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच सरळसेवा भरतीसाठी राजस्थानच्या धर्तीवर वन टाइम रजिस्ट्रेशन पद्धत सुरु करावी. UPSC प्रमाणे सरसकट 100 रु परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती रोहित पवार यांनी केली.
याबाबत रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहीले की, “सरळसेवा परीक्षेसाठी एक विद्यार्थी जवळपास 15 हून अधिक पोस्टसाठी अर्ज करतो. त्यामध्ये अजून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी असते. त्यामुळं एका विद्यार्थ्याला जवळपास 20000 हजार रुपयापर्यंतचा खर्च जातो. त्यामुळे सरळसेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे 1000 हजार रुपयाचे परीक्षा शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नसल्याचे पोहित पवारांनी पत्रात म्हटलं आहे. राजस्थानच्या धर्तीवर one time registration पद्धत सुरु करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच UPSC प्रमाणे सरसकट 100 रुपये परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती केली.”
#सरळसेवा परीक्षेसाठी एक विद्यार्थी जवळपास 15 हून अधिक पोस्टसाठी अर्ज करतो,त्यामध्ये अजून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी असते, असं सर्व एकत्रितरित्या ,एका विद्यार्थ्याला जवळपास 20000 ₹ पर्यंत हा खर्च जातो.त्यामुळे सरळसेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे 1000 रु #परीक्षा_शुल्क… pic.twitter.com/z6DOissBso
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 29, 2023
याशिवाय रोहित पवार यांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुष्टीने आणखी एक महत्वाची मागणी केली आहे. अनेक विद्यार्थ्यांना परिक्षांसाठी दूर अंतरावरील परीक्षा केंद्र मिळते. त्याचा मोठा खर्च विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळं सरळसेवा परीक्षासाठी विद्यार्थ्यांना मोफत एसटीचा प्रवास उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, याआधी रोहित पवार यांनी पेपरफूटी प्रकरणी देखील लवकर निर्णय घेण्याची मागणी केली होती. राज्यात सध्या पेपरफूटीची अनेक प्रकरणे समोर येत असून याबाबत योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे.