हैदराबाद :- दूरसंचार विभागाने विकसित केलेल्या पोर्टलच्या आधारे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल पुन्हा शोधून काढण्याच्या प्रकरणात तेलंगणा राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सीईआयआर पोर्टलच्या आधारे या मोबाईल फोन्सची पुनर्प्राप्ति करण्यात आली आहे.
या आधारे 110 दिवसांत एकूण 5038 मोबाईल परत मिळवले गेले आहेत. चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल परत मिळवण्याचे हे प्रमाण 67.78 टक्के इतके आहे. हेच प्रमाण कर्नाटकात 54.20 टक्के, आंध्र प्रदेशात 50.90 टक्के,इतके आहे
मोबाइल चोरी आणि बनावट मोबाइल उपकरणांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाद्वारे विकसित केलेले हे पोर्टल, 17 मे 2023 पासून देशभरात सुरू करण्यात आले आणि ते सर्वात प्रथम प्रायोगिक तत्त्वावर तेलंगणामध्ये 19 एप्रिल 2023 पासून आणि कर्नाटकमध्ये सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आले. हे सीईआयआर पोर्टल तेलंगणातील सर्व 780 पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहे.
अतिरिक्त डीजीपी महेश एम भागवत यांना या पोर्टलसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या विभागाने 110 दिवसांच्या कालावधीत 5,038 हरवलेली/चोरी झालेली मोबाईल उपकरणे जप्त केली आणि ती संबंधीतांपर्यंत पोहचवली. त्यापैकी शेवटचे 1,000 मोबाईल केवळ 16 दिवसांत परत मिळवून तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले.