मुंबई – बागेश्वर धमाचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी आजपर्यंत अनेक विधाने केली आहेत ज्यामुळे देशात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना कायद्याच्या कचाट्यातदेखील अडकावे लागले आहे. दरम्यान, नुकतंच पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांनी एक विधान केले आहे ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
एका कार्यक्रमात शास्त्री यांनी शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी “गीदड की खाल ओढकर कोई शेर नही बन सकता..’ (गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही.) असे म्हटले. तसेच यावेळी शास्त्री यांनी साई बाबांना ईश्वर मानन्यास नकार दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली असून, अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.
दरम्यान, अश्यातच भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनीही धीरेंद्र शास्त्रींवर टीकास्र सोडलं असून त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देसाई यांनी केली. त्यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ देखील शेअर केला असून, त्याचा हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.
आपल्या व्हिडिओत तृप्ती देसाई म्हणाल्या, “धीरेंद्र शास्त्रीजी, साईबाबा हे कोट्यवधी भक्तांसाठी देवच आहेत. तुमचा सनातन धर्म कोणता आहे? आणि तो साईबाबांना देव का मानत नाही? हे मला माहीत नाही. परंतु जे लाखो भक्त साईबाबांना देव मानतात, त्यांची श्रद्धा दुखावली आहे. तुम्ही त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.’ असं त्या म्हणाल्या आहेत.
ते साईबाबांना देव मानत नसतील तर धीरेंद्र शास्त्रींना महाराज म्हणायची काहीच गरज नाही. ते आधीच जोकरसारख्या टाळ्या वाजवत असतात. मध्येच हसत असतात. पण आम्ही तुम्हाला जोकर म्हणणार नाही. कारण आमचा धर्म आम्हाला असं काही शिकवत नाही. आम्ही माणुसकी हाच धर्म मानतो. तो धर्म आम्हाला कुणाच्यात भेदभाव करायला शिकवत नाही..’ असं देखील त्या आपल्या व्हिडिओत म्हणाल्या आहेत.
नेमकं साईबाबांविषयी धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले होते, वाचा….
साईबाबांविषयी बोलताना ते म्हणाले, “आमच्या धर्माचे शंकराचार्य यांनी साई बाबांना ईश्वराचं स्थान दिलेलं नाही. शंकराचार्य यांचं मत मानणं अनिवार्य आहे. त्यांच्या मताचं पालन करणं प्रत्येक सनातनी व्यक्तीचं कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असो अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचं स्थान देता येणार आहे.’ असे म्हणाले.
पण पुढे बोलताना शास्त्री यांनी, कोणतेही संत ते तुलसीदास असतील, सूरदास असतील किंवा इतर कोणतेही ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत.
परंतु मी हे बोलणंदेखील गरजेचे आहे की, गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही. याला लोक वादग्रस्त वक्तव्य म्हणतील पण हे बोलणं खूप गरजें आहे. आपण साईबाबांना संत म्हणू शकतो, फकीर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही”. असे त्यांनी म्हटले.