कोल्हापूर – देशभरात करोनाच्या दुसरी लाट सुरू आहे. गेली दीड वर्षे अशा संकट काळामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमड़ली आहे. कोल्हापूर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता हा जिल्हा करोनाचे देशातील सर्वाधिक रुग्ण असलेला जिल्हा बनला आहे. या गंभीर प्रसंगी प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊनचे निर्बंध कडक केले आहेत. लॉकडाऊनचे निर्बंध लावताना “एमआयडीसी’ क्षेत्राचा विचार प्रशासनाच्या वतीने केला गेला नाही.
आज लॉकडाऊनमुळे कोल्हापूरमधील पंचतारांकित कागल, गोकुळ शिरगाव तसेच शिरोली चखऊउ दिनांक 16 मे पासून 23 मे पर्यंत पूर्णपणे बंद आहेत. या कालावधीत उच्चदाब वीज ग्राहकांना याचा फारच तोटा सहन करावा लागणार आहे. कारण किमान आकार हा 411 रुपये प्रति केव्हीए असा असतो. उदाहरणार्थ, किमान 2000 केव्हीए. 8,22,000 केव्हीए हा कायम दर आहे याचा अर्थ 8 ते 10 दिवस कारखाने बंद ठेवून पूर्ण 26 दिवसासाठी किमान आकार भरावा लागणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 16 मे पासून 23 मे पर्यंत प्रशासनाच्या वतीने केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या बंद काळातील “एमआयडीसी’ क्षेत्रातील ग्राहकांचा तोट्याचा किंवा नाहक भरावा लागणार विजेचा किमान आकार रद्द करून या ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेल द्वारे केली.