राहुरी, (प्रतिनिधी): अहमदनगर शहराच्या नामांतरणाच्या निर्णयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने राहुरी शहरातील अहिल्याभवन येथे फटाके फोडून व पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर व्हावे, या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख विजय तमनर, दत्तात्रय खेडेकर, ज्ञानेश्वर बाचकर, सचिन डफळ, राजेंद्र तागड, अॅड. अक्षय भांड, विनोद पाचारणे, बापुसाहेब बाचकर, निशांत दातीर, अशोकराव कोळेकर, किरण थोरात, पत्रकार सुनिल नजन,
सचिन कोळपे, जगन्नाथ तात्या गावडे, शंकर खेमनर, किरण थोरात, इंद्रजित खेमनर, अमोल खेमनर, भागाजी गावडे, राजू तागड आदींसह समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या वतीने मागीलवर्षी संपूर्ण नगर जिल्ह्यात नामांतर यात्रा काढण्यात आली होती.
सुमारे १ हजार १०० ठराव जमा करून हे ठराव शासनाच्या विविध विभागांना पाठविण्यात आले. अखेर या कृती समितीला यश आले असून, मंत्रीमंडळच्या बैठकीत अहमदनगर शहराच्या नामांतरणाबाबत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे नामांतर कृती समितीच्या वतीने राहुरी येथील अहिल्याभवन येथे अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नंतर फटाके फोडत, पेढे वाटप करून राज्य सरकारच्या या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अलका तमनर, भाऊसाहेब वडितके, प्रा. गडधे, दादाभाऊ तमनर, पोपट शेंडगे, वसंत पाटोळे, कैलास केसकर, महेश तमनर, भारत मतकर, सुजित तमनर, अनिस शेख, दर्शन खेडेकर, श्रीकांत खेमनर, कोंडीराम बाचकर, सूरज विटनोर, गौतम गाडे, योगेश लबडे, तमनर पेंटर, भागवत झडे, अनिल डोलनर आदींसह मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव उपस्थित होते.