कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील पाच एकर उसातील आग लागून सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे . ही आग दुपारच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामुळे पाच एकरातील ऊस जळून खाक झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हलकर्णीच्या गावातील पाच एकरातील ऊसाच्या फडाला दुपारच्या दरम्यान अचानक आग लागली. त्यात 5 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे चार लाख रूपयांचे नुकसान झाले.
या पाच एकरातील दहा शेतकरी बांधवांचे नुकसान झाले असून या ऊसाला लागलेल्या आगीमुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला असून झालेल्या ऊसाची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहे.