मुंबई – प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरीही ते दीवास्वप्नच ठरणार असल्याचे संकेत बीसीसीआयच्या सुत्रांनी दिले आहेत. विराट कोहलीला अन्य काही पर्याय असल्याने बुमराहला ही जबाबदारी इतक्यात मिळेल असे दिसत नसून त्याला काही काळ वाट पाहवी लागेल, असेही संगण्यात येत आहे.
सध्या तरी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांचे नाव पुढे येत असून क्रिकेटच्या तिनही प्रकारात एकच कर्णधार असावा असेही मत बीसीसीआयच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. जर दोन कर्णधार नियुक्त करायचे ठरले तर मर्यादीत षटकांच्या सामन्यांचे नेतृत्व रोहितकडेच कायम राहणार असून कसोटी संघाचे नेतृत्व राहुलकडे देण्यात येइल. मात्र, या बाबतची घोषणा भारतीय संघ मायदेशी परतल्यावर होणार आहे.
मला नेतृत्वाची संधी दिली गेली तर तो माझा सन्मान असेल. पण ही संधी नाही मिळाली तरी मी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त सरस कामगिरी करण्यासाठीच सज्ज राहिन, असे बुमराह म्हणाला होता.
निवड समितीचे सदस्य राहुल आणि रोहितला भेटल्याचे समोर आले असून रोहितच्या अनुपस्थितीत बुधवारपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत राहुलच संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे बुमराहने आपली इच्छा व्यक्त केली असली तरीही ती प्रत्यक्षात येण्यासाठी तसे मत बीसीसीआयच्या बैठकीत सर्वांना पसंत पडले पाहीजे, असेही बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले आहे.