मुंबई – “खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यंदाच्या अर्थसंकल्प अर्थसंकल्पावरून मोदी सरकारला लगावला आहे. सादर झालेला अर्थसंकल्प म्हणजे फक्त शब्दांचा बुडबुडा असाच होता. सर्वसामान्यांसाठी कुठला दिलासा मिळालेला नाही. एकंदरीतच संपूर्ण निराशाजनक असा अर्थसंकल्प सादर झाला, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचे ट्विट
2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे “खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला”..!!
आज सादर झालेला अर्थसंकल्प म्हणजे फक्त शब्दांचा बुडबुडा असाच होता. सर्वसामान्यांसाठी कुठला दिलासा मिळालेला नाही. एकंदरीतच संपूर्ण निराशाजनक असा अर्थसंकल्प सादर झाला.#Budget2022 #UnionBudget2022
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 1, 2022