मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लागू केलेले नवीन तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. आज पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी कृषी कायदे मागे घेणार असल्याचं म्हटलं. त्यावरून आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, देशातील अनेक शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना हे कायदे मान्य आहेत. केवळ एक विशिष्ट गट कायद्यांच्या विरोधात आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील यावर शेतकऱ्यांना अनेकवेळा फटकारलं. तरी या गटाने ऐकलं नाही. त्यामुळे मोदींना कायगे मागे घेण्याची घोषणा करावी लागल्याचं पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान देशात काही चांगलं होत असेल तर त्यात मोदींनी कायम विरोध होतो. खुद्द मोदींनी म्हटलं की, एका विशिष्ट गटाला कायद्याचं महत्त्व पटून देण्यात आम्हीच कमी पडल्याचं मोदींनी म्हटलं. त्यामुळे आपण मोदींना विनंती करणार की, शेतकऱ्यांना समजवून पुन्हा ते कायदे आणले पाहिजे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.