मॉस्कोः भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियातील मॉस्कोमध्ये सुरु असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही देश सीमेवरील तणाव कमी करण्याच्या मुद्दयावर सहमत झाले. भारत आणि चीनदरम्यान तणाव कमी करण्यासाठी एका पंचसूत्रीवर सहमती झाली आहे.
मॉस्कोमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याविषयी माहिती दिली. भारत एलएसी (लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) वर सुरु असलेला तणाव वाढवू इच्छित नसल्याचे त्यांनी म्हटले. भारताने म्हटले आहे की, चीनसोबत भारताच्या धोरणात तसेच भारताविषयी चीनच्या धोरणात कुठलाही बदल झालेला नाही. मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यातील बैठक काल रात्री आठ वाजता काँग्रेस पार्क वोलकोंस्की हॉटेलमध्ये सुरु झाली. ही बैठक जवळपास 10.30 वाजता संपली.या बैठकीतच पंचसूत्री कलमांवर एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भारत-चीनदरम्यान या पंचसूत्रीवर झाली सहमती
* आपापसातील मतभेदांचं वादात रुपांतर होऊ दिलं जाणार नाही
* दोन्ही देशांचं सैन्य विवादित क्षेत्रातू वापस घ्यावं
* निश्चित केलेल्या नियमांनुसार दोन्ही देशांमधील बातचीत सुरु ठेवावी
* सध्याच्या संधी आणि प्रोटोकॉल्स दोन्ही देश मानणार
* दोन्ही देश असं कुठलंही पाऊल उचलणार नाही ज्याने तणाव वाढेल