नवी दिल्ली- करोना विषाणूच्या संकटात भारताने आता जगात दुसरा क्रमांक मिळवला आहे. या निमित्ताने घेण्यात आलेल्या एका सर्वेप्रमाणे बहुतांशी भारतीयांना रुग्णालयात भरती होण्याची भीती वाटते असा निष्कर्ष समोर आला आहे. आपल्या कुटुंबाला त्रास होईल अशी काळजीची भावना याला कारणीभूत आहे.
देशातील २२१ जिल्ह्यातील २४००० लोकांशी बोलून हा सर्वे घेण्यात आला त्यामध्ये लोकांना तुम्हाला सर्वात जास्त भीती कशाची वाटते असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा २९ टक्के लोकांनी कुटुंब किंवा मित्रांना बाधा होण्याची भीती व्यक्त केली.
तर २२ टक्के लोकांनी रुग्णालयात भरती होण्याची भीती वाटत असल्याचे सांगितले ५ टक्के लोकांना विलगीकरणाची,८ टक्के लोकांना आजार टोकाला जाण्याची, तर ६ टक्के लोकांना स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवण्याची भीती वाटते १७ टक्के लोकांना उत्पन्न कमी होण्याची भीती वाटते या सर्वेमधील निष्कर्षाप्रमाणे ७७ टक्के लोकांच्या सोशल संपर्कातील किमान एकाला तरी करोनची बाधा झाली आहे.
सरकारी रुग्णालयात भरती केल्या जाण्याच्या भीतीने अनेकजण करोनाची चाचणी करण्यासही घाबरत असल्याची बाब या सर्व्हेमध्ये समोर आली.