मुंबई – सीमावासीयांच्या पिढ्यान्-पिढ्या कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजूट करणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासींच्या पाठीशी असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. तसेच कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा राज्यात आणणार, असा ठाम निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे म्हणाले, एखादा प्रश्न न्यायालयात असेपर्यंत परिस्थिती “जैसे थे’ ठेवली पाहिजे; परंतु कर्नाटक सरकारने बेळगावचे नामांतर, उपराजधानीचा दर्जा तसेच तेथे विधानसौदाची उभारणी करून न्यायालयाचा अवमान करण्याचे काम केले आहे. त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
सीमावादावर सुप्रीम कोर्ट शेवटचे हत्यार
यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे असं म्हणत सीमावादावर त्यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. ते पत्रकारांशी बोलतांना पुढे म्हणाले,’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगाव महाराष्ट्रात घेण्याची तयारी चालविण्याचे बोलत आहेत. असे असेल तर मुंबई प्रांत पूर्वी कर्नाटकात होता. त्यानुसार महाराष्ट्राने बेळगाव घेऊन मुंबई कर्नाटकाला द्यावी, अशी मागणी सुद्धा उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली.
दरम्यान, लक्ष्मण सवदी यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा सीमावाद प्रश्नावरून वाद पेटण्याची चिन्ह दिसून येत आहे . तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सीमावादावर सुप्रीम कोर्ट शेवटचे हत्यार असेल असं म्हणत शरद पवारांनी मांडली भूमिका आहे .