BLA Attack on Pak army : बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्करावर हल्ला केला असल्याचे समोर आले आहे, या हल्ल्यात तब्बल 45 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, बलुच सरकारच्या सूचना मंत्र्यांनी लष्कराकडून पाकिस्तानच्या जवानांच्या मृत्यूचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देत आहे. पाकिस्तान सरकार बलुच लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून मानते. तर बलुच लिबरेशन आर्मीने दावा केला आहे की त्यांनी बलुचच्या मच्छ भागात 45 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आहे. प्रांतीय सरकारचे म्हणणे आहे की सुरक्षा दलांनी मार्चमध्ये बलुच आर्मीने केलेला हल्ला हाणून पाडला आहे.
बलुच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी, सोमवारी रात्री ऑपरेशन दारा-ए-बोलानमध्ये बलुचिस्तानच्या बोलान जिल्ह्यात किमान 45 पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार झाले आहेत” असे म्हटले आहे. बीएलएने दावा केला आहे की त्यांनी बोलानच्या मच्छ शहरात किमान 45 पाकिस्तानी लष्करी सैनिकांना ठार केले आहे. जेल, रेल्वे स्टेशनसह अनेक ठिकाणे ताब्यात घेतली आहेत.
एका वृत्तानुसार, बलुच आर्मीचे प्रवक्ते जिआंद बलोच म्हणाले- “ऑपरेशन दारा-ए-बोलान” अंतर्गत हे हल्ले झाले आहेत. ठार झालेल्या पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आपल्या ताब्यात असल्याचा दावा त्यांनी केला. बीएलएच्या प्रवक्त्याने धमकी दिली की जो कोणी ऑपरेशन दारा-ए-बोलान थांबवण्याचा प्रयत्न करेल त्याला संपवले जाईल.
बलुच आर्मीच्या हल्ल्याची कबुली देताना बलुचिस्तान सरकारचे माहिती मंत्री जान अचकझाई म्हणाले – पाकिस्तानी सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री मच्छ भागात दहशतवाद्यांनी केलेले तीन हल्ले हाणून पाडले आहेत. तर ट्विटरवर त्यांनी लिहिले – दहशतवादी अस्लम आचो ग्रुपशी संबंधित होता. या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे मंत्री म्हणाले. आमचा एकही सैनिक जखमी झालेला नाही. मंगळवारी सायंकाळपर्यंत परिस्थिती सामान्य होईल, असा दावा मंत्र्यांनी केला आहे.