मुंबई – महाराष्ट्रात काल आगळीक झाली. एका केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची वेळ राज्याच्या पोलिसांवर आली. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाचा कडेलोट आज महाराष्ट्राने अनुभवला.
सत्तेत आल्यापासून आजवर सातत्याने जवळपास सर्वच अश्या सुडाच्या #cases मध्ये न्याय पालिकेने महाराष्ट्र सरकारला चपराक लगावली आहे. निदान आता तरी मलम लावत बसण्यापेक्षा राजधर्माचे पालन करा. एवढीच जनतेची अपेक्षा.
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) August 25, 2021
कालच्या घटनेवर मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोशलवर मीडिया किंवा माध्यमांना काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र आज सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी नारायण राणेंना नको नको त्या उपमा देत त्यांच्यावर हल्ला चढवलाय. आजच्या अग्रलेखात त्यांनी राणेंना 5 उपमा दिल्यात. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत त्यांनी राणेंवर प्रहार केलाय.
#NarayanRane साहेबांना न्यायालयाने जामीन मंजूर करून खुद्द न्यायपालिकेनेच द्वेषाचे अन सुडाचे राजकारण करणार्या #महाराष्ट्रसरकार च्या कानशीलात लगावली नाही तर काय आहे ? आता काय न्यायपालिकेवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करणार आहात का ? सर्व सामान्य जनतेला पडलेला प्रश्न
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) August 25, 2021
त्यावर आता भाजपाने आपली पहिली प्रतिक्रिया देत या टीकेचा निषेध करत शिवसेनेवर सूडाचं राजकारण करण्याचा आरोप केलाय. घाटकोपरचे भाजपा आमदार राम कदम यांनी अग्रलेखाबरोबरच शिवसेनेवर टीका केलीय.
नेमकं काय म्हणाले राम कदम
“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सूडबुद्धीनं महाराष्ट्र सरकारने कारवाई केली. सत्तेतचा गैरवापर करत अनेकांविरोधात सूडाची कारवाई केली. मात्र त्या त्यावेळेस न्यायपालिकेनं यांना सणसणीत चपराक दिली,” असं कदम म्हणाले.