मुंबई : एकीकडे बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असा नवा गट स्थापन केल्याची माहिती टीव्ही माध्यमांमधून मिळते आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील बैठक घेतली. या बैठकीनंतर मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा भाजपशी काही संबंध नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा भाजपशी काहीही संबंध नाही. हा शिवसेनेचा पक्षाअंर्तगत वाद आहे. शिवाय सध्या शिवसेना बंडखोर आमदार परत येण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र बंडखोर आमदार परत येणार नाहीत असे देखील रामदास आठवले यांनी सांगितले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून शिवसैनिकांकडून आंदोलन आणि तोडफोडीचे प्रकार झाले आहेत त्यावर देखील रामदास आठवले यांनी भाष्य केले असून शिवसेनेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं म्हंटलं आहे. पोलिसांनी यात लक्ष घालून कारवाई केली पाहिजे असे देखील माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी म्हंटलं.
सध्या जी राजकीय परिस्थतीती सुरु आहे त्यामध्ये भाजपचा हात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्हिसी द्वारे साधलेल्या संवादात म्हंटले होते. आज भाजपच्या झालेल्या बैठकीनंतर मात्र रामदास आठवले यांनी हा शिवसेनेचा अंतर्गत वाद असून यात भाजपचा संबंध नसल्याचे म्हंटले आहे.