मुंबई -मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. तुमचा मुलगा खासदार बनू शकतो. मग, माझ्या मुलाने (आदित्य) काहीच करू नये का, असा थेट सवाल शिवसेनेच्या पदा-धिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधताना ठाकरे यांनी शिंदे यांना उद्देशून विचारला.
यानंतर आज शिवसैनिकांनी राज्यातील अनेक जिल्हामध्ये आंदोलन सुरु केले आहे. खेकडा सावंत गद्दार असे लिहीत बंडखोर नेत्यांविरोधात शिवसैनिकांचे आक्रमक आंदोलन दिसून येत आहे. तानाजी सावंत यांच्या विरोधात रोष वाढला आहे. शिवाय बंडखोर आमदारांचे कार्यालय शिवसैनिकांकडून फोडले गेले.
यावरून आता भाजपच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. राणा माध्यमांशी बोलतांना म्हणाला,’खऱ्या शिवसैनिकांच्या कार्यालयावर मुख्यमंत्री गुंड पाठवत आहेत. असा आरोप नवनीत राणा यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या,’आमदारांच्या कुटुंबियांना खुलेआम धमकी द्यायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी.. आमदारांच्या कुटूंबाना केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी.’ अशी मागणीही राणा यांनी केली आहे.