मुंबई – 12 आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निकाल आज आलेला आहे. त्या निकालाची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर सचिवालय त्यावर अभ्यास करेल आणि त्यानंतर अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, अशी प्रतिक्रिया 12 आमदारांच्या निलंबनावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, हा सरकारचा निर्णय नसून विधिमंडळाचा निर्णय आहे. विधिमंडळाचे अधिकार आणि न्यायालयाचा आदेश याबाबतीत निश्चितरुपाने जो अभ्यास करायचा असेल तो विधिमंडळ सचिवालय करेल आणि अध्यक्ष महोदय अंतिम निर्णय घेतील, अशीही माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी दिली.