पाटणा : राष्ट्रीय नागरिकत्व सुचीवर (एनआरसी) बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी टीका केली. एनआरसी अनवाश्यक आहे. त्याचे समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे बिहारमध्ये त्याची अंमलबजावणी होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
कावर चर्चा होऊ शकते. लोकांना हवे असेल तर या कायद्याबाबत सभागृहात चर्चा होऊ शकेल. मात्र एनआरसीचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचे समर्थनही होऊ शकत नाही, असे नितीशकुमार बिहार विाधानसभेत म्हणाले.
एनआरसी मुद्दा फक्त आसामपुरताच होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हे स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले. विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी भाजपाचा मित्र पक्ष असणाऱ्या जनता दलने एनआरसी आणि का कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले होते. त्याला नितिशकुमार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, एनआरसीची चर्चा कोठून सुरू झाली हेच समजत नाही.
या मुद्यावरून देशांत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एनआरसी आसाममध्ये राबवण्याची गोष्ट राजीव गांधी यांनी केलेल्या करारामुळे झाली.
सुधारीत नागरीकत्व विधेयकाला जनता दल संयुक्तने पाठींबा दिला होता. मात्र ही गोष्ट मतदारांना पटली नसल्याचे लक्षात येताच एनआरसीला नितीशकुमार यांनी विरोध केला. पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनीही एनआरसीला नितीशकुमार यांचा विरोध आहे,असे वक्तव्य केले. त्यापाठोपाठ नितीशकुमार यांनी अधिकृत निवेदन करून आपली भूमिका मांडली.