नगर – सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहे. जनताच कुंभकर्णासारखी झोपली. त्यामुळे हे शक्य आहे, असं काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं होतं. मात्र आता लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला तीन महिन्यांची मुदत देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हे सरकार फक्त पडण्यासाठी घाबरत, त्यामुळे हे सरकार मोर्चे आंदोलनाला घाबरत नाही. मात्र जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी लोकायुक्त कायदा लागू करावा, या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे अण्णा यांनी स्पष्ट केलं.
लोकपाल व लोकायुक्त कायदा अत्यंत प्रभावी आहे. मुख्यमंत्री, आमदार, अधिकारी यांच्याविरोधात सक्षम पुरावे लोकायुक्तांकडे दिले तर त्यांची चौकशी करून कारवाई होऊ शकते, असा हा कायदा आहे. परंतु राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.
सरकारला लोकपाल व लोकायुक्त कायदा आणण्यासाठी मागणी केली होती. आता या सरकारला तीन महिन्याचा कालावधी देत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी राज्य सरकार विरोधात उपोषण करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला.
दरम्यान आंदोलनासाठी आतापासून आम्ही कार्यकर्त्यांना कळवत आहोत.
प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या तयारी लागा, अशा सूचना देण्यात येत आहेत. आता सप्टेंबर आहे, आम्ही एक नोटीस देणार देऊ, त्यानंतर एकाच वेळी राज्यभरात अहिंसेच्या मार्गाने मोठं आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी सांगितले.