मुंबई – भ्रष्टाचाराविरोधात लढा देणारे अण्णा हजारे (Anna Hazare) सध्या चर्चेत असल्याचे दिसत नाही. 2011 मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर त्यांनी आंदोलन केले होते. मात्र भाजपचे सरकार आल्यानंतर अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात एकही शब्द काढला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनीही अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. ट्वीटद्वारे आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो शेअर करत खोचक टोला लगावला आहे.
यावर आता अण्णा हजारे यांनी मीडियाशी बोलतांना संताप व्यक्त केला आहे, अण्णा हजारे म्हणाले,’माझ्यामुळं देशाचं वाटोळं झालं, असं म्हणायचं. पण, मी केलेल्या कायद्यामुळे जनतेचा फायदा झाला. माहितीचा अधिकार देशाला मिळाला. माझ्या आंदोलनामुळे यांच्या कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं, हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले. कदाचित ते त्यांना सहन होत नाही.” असं म्हणत अण्णा हजारे यांनी आव्हाड यांच्या खोचक टोल्यावर प्रतिउत्तर दिल आहे.
जितेंद्र आव्हाड ट्वीट –
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही.’ मात्र अण्णा हजारे यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी नेमके कोणत्या कारणामुळे टीका केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु अनेकजण या पोस्टचा संबंध अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर केलेल्या आंदोलनाशी जोडला जात आहे.
अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये मोठे आंदोलन केले होते. त्यांनी राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर भ्रष्टाचारविरोधी आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी यूपीए सरकारकडे लोकपाल कायदा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर देशभरात काँग्रेसविरोधात वातावरण तयार झाले होते. यासाठी त्यांनी उपोषणही केले होते. सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे.
ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले
टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही pic.twitter.com/hDLIsSW8g9— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 5, 2023