Congress leader Jairam Ramesh ।आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. गंगोपाध्याय यांनी महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यावर केलेल्या ताज्या वक्तव्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे.
Congress leader Jairam Ramesh । काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर पोस्ट
‘कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भाजप उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला. पंतप्रधानांच्या आशीर्वादाने त्यांनी हे पाऊल उचलले. आता गांधी आणि गोडसे यांच्यात निवड करू शकत नाही हे त्यांचे विधान दयनीय पेक्षा वाईट आहे. हे अजिबात मान्य करता येणार नाही. ज्यांनी महात्माजींचा वारसा हिरावून घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही अशा लोकांनी त्यांची उमेदवारी त्वरित मागे घ्यावी.’ अभिजित गंगोपाध्याय यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी त्यांना भाजपचे उमेदवार बनवण्यात आले आहे.
त्यांनी अलीकडेच एका बंगाली वाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, ‘त्यांना गांधी आणि गोडसे यापैकी एकाची निवड करता येत नाही. असं वादग्रस्त विधान केलं होत.
या टीव्ही कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान त्यांना रॅपिड फायर राउंडमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले. या एपिसोडमध्ये गंगोपाध्याय यांना गांधी आणि गोडसे यांच्यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले होते. यावेळी ते म्हणाले,’मी आत्ताच याचे उत्तर देणार नाही, मला याचा विचार करण्याची गरज आहे. विधी व्यवसायाशी निगडित व्यक्ती म्हणून मी कथेची दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला त्यांचे (नथुराम गोडसे) लेखन वाचावे लागेल आणि त्यांना महात्मा गांधींची हत्या करण्यास कशामुळे भाग पाडले हे समजून घ्यावे लागेल.’ असेही ते म्हणाले आहे.
Congress leader Jairam Ramesh । गंगोपाध्याय ऑगस्टमध्ये निवृत्त होणार …
‘उच्च न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिस करत असताना, गंगोपाध्याय 2 मे 2018 रोजी कोलकाता उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बनले. उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, त्यांची 30 जुलै 2020 रोजी पदोन्नती झाली आणि स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. या वर्षी ऑगस्टमध्ये ते निवृत्त होणार होते. तत्पूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गंगोपाध्याय म्हणाले, ‘आज मी एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. मी भाजपमध्ये प्रवेश करून आनंदी असून पक्षाचा सैनिक म्हणून काम करणार आहे. राज्यातून भ्रष्ट टीएमसी राजवट हद्दपार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.’
हे वाचले का ? ”श्रीकांत शिंदे विरोधात लढण्यास ठाकरे गटातील नेत्यांचा ‘नकार’ आता…”